हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ले-विजयदुर्ग ०९

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇🏇
🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
🧗🏿♀🧗🏿♀🧗🏿♀ *किल्ला क्र.09* 🧗🏿♀🧗🏿♀🧗🏿♀
⛳⛳⛳ *किल्ले विजयदुर्ग* ⛳⛳⛳
विजयदुर्ग किल्ल्याचा माहिती
विजयदुर्ग किल्ला हा महराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्यातील देवगडजवळील विजयदुर्ग गावाजवळचा एक ऐतिहासीक किल्ला आहे. हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला जवळपास सतरा एकरात पसरलेला आहे. तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेडलेला व अतिशय भक्कम अशा तिहेरी तटबंदीने बांधलेला हा किल्ला आहे. ह्या किल्ल्यावर एकूण जवळपास २७ बुरुज आहेत. हा मराठ्याच्या आरमार इतिहासातील एक महत्वपूर्ण किल्ला आहे.
विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास
विजयदुर्ग किल्लाचे जुने नाव "घेरिया" असे होते. विजयदुर्ग किल्ला हा ११व्या शतकातील शिलाहार घराण्याच्या राजा भोज याने बांधला. पुढे इथे बहामनी व आदिलशाही यांनी राज्य केले. पुन्हा १६५३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा जिंकला . जवळपास १६५३ ते १८१८ पर्यत हा किल्ला मराठ्याच्या साम्राजात होता. पुढे त्या किल्ल्याचा ताबा इंग्रजाकडे गेला.
विजयदुर्ग किल्ल्यावर काय पाहाल ?
हनुमान मंदिर :- मुख्य तटबंदीतून आत आल्यावर व किल्ल्याच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर गडात प्रवेश करताच आपणाला हनुमान मंदिर दिसेल. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला त्या वेळी महाराजांनी गडावर हनुमान मंदिर बांधले. आता ह्या मंदिराची पुनर्बांधणी केली गेली आहे. मंदिराजवळ एक भग्न अवस्थेत असेलेली तोफ पहावयास मिळेल.
जिबीचा दरवाजा :- हा किल्ल्यावरील पहिला दरवाजा प्रशस्थ तटबंदी बांधला गेलेला एक भक्कम दरवाजा आहे. थोडे पुढे गेल्यावर आपणाला किल्ल्याच्या तटबंदीवर पांढरे डाग दिसतील हे डाग तोफांच्या भडीमारचे आहेत. १७१८ साली इंग्रजानी केलेल्या ह्मल्याची त्या खुणा साक्ष देतात त्यावेळी किल्ल्या काणोजी आंग्रे याच्या ताब्यात होता. तसेच तटबंदी मध्ये आपणाला जंग्या ज्या बाणांच्या किंवा बंदुकीच्या साह्याने शत्रू वर मारा करण्यासाठी बनवल्या आहेत तसेच फांज्या जिथुन शत्रूवर मोठ्या तोफा मार्फत हमला केला जाई. तसेच किल्ल्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तटबंदीतून जागोजागी नाले काढण्यात आले आहेत.
महादरवाजा :- जीबीच्या दरवाजातून थोडे पुढे चालत गेल्यावर आपणाला वक्राकार आकाराची तटबंदी दिसते त्याच्या आत मध्ये पायऱ्या चढून गेल्यावर हा दरवाजा लागतो. यालाच किल्ल्याचा मुख्य दरवाजा असे हि म्हणतात. अतिशय भक्कम व मजबूत असा किल्ल्याचा दरवाजा आहे. त्याच्या आत आपणाला पहारेकारच्या देवरी व दरवाजावर नगारखाना पहावयास मिळते. याच दरवाजातून आत आल्यावर आपला समोरच तोफगोळ्यांची रास पहावयास मिळते.
खलबतखाना :- खलबतखानाचा उपयोग कारभारची बैठक किंवा लढाई करण्याचे मनसुबे आखण्यासाठी करत असे. ह्या वास्तूची रचना अर्धगोलाकुर्ती पद्धतीची आहे.हि एक मजबूत अशी वास्तू आपणाला पहावयास मिळते.
खुबलढा बुरज :- ह्या बुरजावर ६ फांज्या आहेत व त्या प्रत्येक फांज्यामध्ये एकूण २ तोफा लावलेल्या असत त्यामुळे याला खुबलढा तोफाबारा असे हि मानतात. या ठिकाणावरून तीन ठिकाणी मारा करता येतो.
भूयारी मार्ग :- किल्ल्यावर दोन भूयारी मार्ग आहेत एक जो मार्ग आहे तो खुबलढा बुरजावर जातो व के भूयारी मार्ग धान्याचे कोठर आहे त्या दिशेला जातो. हि किल्ल्यावरील कुतुहलाचे ठिकाण आहे.
घोड्याच्या पागा :- विजयदुर्ग किल्ल्यावर घोड्यांना बांधण्यासाठी एक मोठी वास्तू आहे इथे जवळपास ६० ते ७० घोडे बांधण्याची जागा आहे. जवळ आपणाला सदरची इमारत पहावयास मिळते.
दारुगोळा कोठार :- सदरेतून बाहेर आल्यावर आपणाला एक छोटेखानी एक इमारत पहावयास मिळते तेच दारुगोळा कोठार होय किल्ल्यावर तोफांची संख्या जास्त असल्यामुळे दारुगोळा भरपूर प्रमाणात लागत असे.
साहेबाची ओठी :- ह्या जागेवर आपणाला एक टेलिस्कोप पहावयास मिळेल याच जागेवरून १८६५ रोजी ब्रिटीश नॉर्मन लॉकियर याने सूर्यावर हेलियम असल्याचा शोध लावला होता.
धान्याचे कोठार :- साहेबाच्या ओटी पासून समोर आपणाला एक वास्तू नजरेस पडते हि वास्तू धान्यचे कोठार आहे. अतिशय मजबूत अशी बांधकामाने बांधलेली हि वास्तू आहे. जवळ आपणाला पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेला एक मोठा हौध नजरेस पडतो ह्या हौधाचा उपयोग जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी केला जाई. ह्या हौधला खाली उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत.
चुन्याचा घाणी :- गडाच्या डागडुजीसाठी वापरण्यात येणारा चुना किल्ल्यावर ह्या चुन्याची घाणीत बनवण्यात जात असे. त्याच्या थोडेसे पुढे गेल्यावर आपणाला घोड्याच्या नालेच्या आकारची गोड्या पाण्याची विहीर पहावयास मिळते.
पाण्यातील भिंत :- जवळपास १७ व्या शतकातील हि भिंत पाण्याखाली बांधण्यात आलेली असावी असे तज्ञाचे मत आहे. हि भिंत गणेश बुरज याच्या बाजूला आहे. ही भिंत मोठमोठे दगडावर बांधली आहे. याची कुतुहलाची बाब अशी कि हि भिंत ओहटी आली तरी नजरेस पडत नाही. याच्यामुळे शत्रूच्या जहाजे या भिंतीवर आदळून नष्ट होत असत त्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण होत असे.
विजयदुर्ग किल्ला कसे पोहचल ?
मुंबई- गोवा महामार्गावरून तळेरे गावापासून विजयदुर्ग साधारणपणे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर आहे. येथून आपणाला एस-टी बस किंवा खाजगी वाहने मिळू शकतात. गडाच्या पायथ्याशी विजयदुर्ग गाव आहे इथे आपल्या खाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...