हा ब्लॉग शोधा

शनिवार, १ डिसेंबर, २०१८

शिवाजीमहाराज

"जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
-- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराज न प्रमाणे लढा !
-- नेताजी सुभाषचंद्र बोस.

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
-- अॅडॉल्फ हिटलर.

"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
-- स्वामी विवेकानंद.

"जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
-- बराक ओबामा, अमेरिका.

"जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
-- इंग्रज गव्हर्नर.

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
-- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
-- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
-- बडी बेगम अलि आदिलशाह.

१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही.
⛳⛳⛳⛳⛳

किल्ला-महिपालगड (५४)

*किल्लेमहाराष्ट्राचे
किल्ला- महिपालगड*

किल्ल्याची ऊंची : 3220

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: कोल्हापूर

जिल्हा : कोल्हापूर

श्रेणी : मध्यम

प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही.

पहाण्याची ठिकाणे :
बेळगावहून ४५ मिनिटामध्ये आपण गडपायथ्याच्या देवरवाडी गावात पोहचतो. या गावातून गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढल्यानंतर आपण प्राचीन वैजनाथ व आरोग्य भवानी मंदिर संकुलात पोहचतो. श्री गुरु चरित्राच्या हरवायचे १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे. मुख्य मंदिर ११ व्या शतकात बांधलेले आहे. प्रवेशद्वारातच एक शिलालेख आहे. मंदिरासमोर सुंदर नंदी आहे. गाभार्यात भव्य शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे. ही आरोग्य भवानी अष्टभूजा आहे. दोन्ही मंदिरे हेमाडपंथी शैलीत आहेत. मंदिरातील खांब अत्यंत आकर्षक व घाटदार आहेत. मंदिराच्या मागे चवदार पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले पवित्र कुंड आहे.

वैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागून डांबरी सडकेने आपण महिपालगडाकडे निघायचे. या मार्गावरुन जाताना डाव्या बाजूच्या डोंगरातील कातळामध्ये प्राचीन गुंफा व भुयारे आहेत. आत प्रवेश करण्यासाठी प्रखर विजेरी आवश्यक आहे, कारण या भुयारातून पाणी भरलेले आहे. या कातळाच्या वर असलेल्या पठारावर भारतीय सैन्यदलाचा नियमित युध्द सराव चालू असतो.

या पठाराच्या उजव्या बाजूने जाणार्या डांबरी सडकेने आपण गडावरील वस्तीवर पोहचायचे. गडावरील वस्ती सुरु होण्यापूर्वी आपणास उध्वस्त तटंबदी, प्रवेशद्वाराचे अवशेष व शिळा दिसतात. गावकरी त्यांना गौळ देव म्हणतात. पुढे शिवरायांचा आश्वारुढ पुतळा दिसतो, येथून पुढे गडाची मुख्य तटबंदी सुरु होते. वस्तीच्या मधून जाणार्या सडकेने पुढे गेल्यावर आपणास बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. यावर गणेशाचे सुंदर शिल्प आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभारलेल्या तटबंदीने हा भाग माचीपासून वेगळा केलेला आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच डाव्या बाजूस कातळात खोदलेली प्रचंड विहिर लागते. तिची लांबी ७० फूट व रुंदी ४० फूट आहे. तिची खोली किती आहे, याच अंदाज कोणालाच नाही. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. ही विहिर पाहून आपण विहिरीच्या मागे असलेल्या अंबाबाई मंदिरात जायचे. उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपणांस सुस्थितीतील निशाण बुरुज लागतो. त्यावर चढण्यास पायर्या आहेत. बुरुजाशेजारीच श्री महादेवाचे मंदिर आहे. तटबंदी आपल्या उजव्या हातास ठेवून आपण गडाचे दुसरे टोक गाठायचे. तटातून खाली उतरणार्या वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदून काढलेली कोठारे दिसतात. परत मागे फिरल्यावर आपणास ढासळलेला दरवाजा दिसतो. त्याचे बुरुज मात्र चांगल्या अवस्थेत आहेत. गडावरील प्रत्येक घरासमोर आपणास इतिहासकाळातील पाणी भरुन ठेवलेली दगडी भांडी दिसतात. गडावरील लोकांना गडाविषयी अभिमान आहे. मात्र त्यांनी तटावरच गवताच्या गंज्या, जनावराचे गोठे बांधल्यामुळे गडाची अवस्था फार बिकट झाली आहे. गडावरील वाढती लोकसंख्या व विभक्त होणारी कुटुंबे ही त्याची कारणे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
महिपाल गडातच मोठे गाव वसलेले आहे. त्याचे नावच "महिपालगड" असे आहे. महिपालगड जरी कोल्हापूर जिल्हयात येत असला, तरी तिथे जाण्यासाठी बेळगाव गाठायचे. बेळगाव मधून शिनोळी फाट्यामार्गे देवरवाडी गावात जायचे. देवरवाडीतून वैजनाथमहिपाल गाव ६ किमी वरच आहे. किल्ल्यातून गाडीरस्ता गेलेला आहे.
राहाण्याची सोय :
गडावर निवासाची व्यवस्था आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे २ तास लागतात.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
*संकल्पना*
*शंकर इंगोले*
९८२२७९७०५९

किल्ला-रोहीलगड (५३)

किल्ले महाराष्ट्राचे

 *किल्ला क्र.५३* 
⛳⛳⛳ *किल्ले रोहिलगड* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 700

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: रोहिलगड

जिल्हा : जालना

श्रेणी : मध्यम

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलगड नावाचा किल्ला आहे. या सपाट प्रदेशात उंच सलग अशी डोंगररांग नाही आहे. छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत. अशाच एका टेकडी वजा डोंगरावर रोहिगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रोहिलगड याच नावाने ओळखले जाते. अंबड ही यादवकालीन बाजारपेठ या किल्ल्याच्या जवळ असल्याने देवगिरी या राजधानीहून बाजारपेठेकडे जाणार्या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती यादव काळात केली गेली असावी.

पहाण्याची ठिकाणे :
रोहिलगड किल्ला गावा मागील डोंगरावर आहे. किल्ला आणि बाजूची टेकडी यांच्या मधून गावातून येणारा कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने रोहिलगड किल्ल्याचा डोंगर आणि टेकडी मधील घळीत येऊन किल्ला चढायला सुरुवात करावी. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर शेतं आहेत. पायथ्यापासून येथे पोहोचण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी डावीकडे वळून ५ मिनिटे चालल्यावर कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेचे छत ९ खांबांवर तोललेले आहे. गुहेत प्रवेशव्दारा जवळ एक कोरडे टाके आहे, टाक्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. गुहेच्या प्रवेशव्दारा समोरील भिंतीत एक चौकोनी ३ X ३ फ़ुटाची खोबण कोरलेली आहे. या गुहेच्या डाव्या बाजूला एक छोटी गुहा आहे. गुहा पाहून परत दोन घळीत येऊन वर चढायला सुरुवात करावी. घळीतून वर चढतांना उजव्या बाजूला रचीव तटबंदीचे अवशेष दिसतात. १० मिनिटात आपण तटबंदी जवळ पोहोचतो. या ठिकाणी तटबंदीच्या खालच्या बाजूला एक बुजलेले कोरडे टाके आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर आपल्याला दोन्ही बाजूला पसरलेले पठार दिसते. प्रथम डाव्या बाजूला जावे. या ठिकाणी किल्ल्यावर गावाच्या बाजूला एका वाड्याचे अवशेष आहेत. पुढे एक पाण्याचे कोरडे पडलेले टाके आहे. ते पाहून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जातांना वाटेत एक दगडी रांजण आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर एका वास्तूचे अवशेष आहेत. येथून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. 

किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन आपण किल्ल्यावर चढून आलेल्या घळीच्या उजव्या बाजूच्या पठारावर जावे. येथे पाण्याचा कोरडा पडलेला तलाव आहे. पुढे गेल्यावर एक खड्डा आणि त्यात उगवलेली बाभळीची झाडे दिसतात. या खड्य़ात एक १२ खांबांवर तोललेल कोरडे खांब टाक आहे. हे टाक पाहून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे गेल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. रोहिलगड हा या भागातली एकमेव डोंगर असल्याने गडावरून दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ला व्यवस्थित पाण्यासाठी अर्धा तास लागतो. 

पोहोचण्याच्या वाटा :
जालना शहर रस्ताने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेले आहे. जालना- अंबड रस्त्याने जालना रोहीलगड अंतर ४० किलोमीटर अंतरावर आहे. रोहिलगडला जाण्यासाठी जालन्याहून थेट एसटी सेवा नाही. जालन्याहून एसटीने अंबड गाठावे. अंबडहुन रोहिलगडला जाण्यासाठी दिवसातून ठराविक वेळेला एसटी बसेस आहेत. खाजगी वहानाने जालन्याहून अंबडला न जाताही थेट रोहिलगडला जाता येते.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही

जेवणाची सोय :
जेवणाची सोय किल्ल्यावर नाही.

पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
रोहिलगड गावातून २० मिनिटे लागतात.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतूत किल्ल्यावर जाता येते.
💐💐💐💐💐💐💐
*संकल्पना*
*शंकर इंगोले*
९८२२७९७०५९
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...